कष्टाला घाबरणाऱ्यातले नाही आम्ही
करून मेहनत, मातीतून सोने पिकवतो नेहमी
वाहते वारे सदैव चैतन्याचे अन् स्फुर्तीचे
जी कवाडे खोलती प्रकाशाचे
का मग भय बाळगावे अंधाराचे ?
अंधारालाही चिरून
खेचून आणू मार्ग ते यशाचे
भिनले नसानसांत संस्कार
शिवबाचे , संतांचे अन् महंतांचे
झोंबतील जरी वारे अपयशाचे
शोधू मार्ग बाहेर पडण्याचे
आहोत राजे आम्ही
आमुच्या मनाचे ......
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर शब्दरचना...👌👍✍️🍫
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteखूपच छान रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete