नाते मग ते कोणतेही असो , बहिण भावाचे, आई वडिलांचे , पती पत्नीचे, मित्र मैत्रिणींचे , प्रियकर प्रेयसीचे ; त्या नात्यांना जर जखडून ठेवले तर मग मनाची
घुसमट जास्त होते. माणूस नात्यांना त्याच्या बंधनात अडकवण्यास लागला की मग ती नाती नकोशी वाटू लागतात.
कित्येकदा असे नकळत घडते की आपण वाजवी पेक्षा एखाद्या नात्यात गुंतत जातो. स्वतःचं, जगाचं, कसलं च भान राहत नाही मग आपल्याला. त्याच विचारांनी आपल्या मेंदूवर ताबा घेतल्याने दुसरे काही करण्याची इच्छा मग आपल्याला राहत नाही. ह्याचा परिणाम आपल्या मनावर तर होतोच पण आपण आपली मनशांती
घालवून बसतो. त्याच्या परिणाम आपल्या शरिरावर देखील होतो. शिवाय लोकांचे टोमणे खावे लागतात कारण लोक तर नावं ठेवण्यास कायम तत्परच असतात.
एखाद्या गोष्टीच्या किती आहारी जावं ह्याचे भान आपण राखले पाहिजे. विनाकारण कोणत्याही नात्यात
गुंतून स्वतःचे मानसिक , शारिरीक संतुलन का बिघडवावे?
जी नाती आहेत ती कायम जर घट्ट राहावी असे वाटत असेल तर , नात्यांना मोकळीक द्या. एकमेकांवर विश्वास ठेवा. अधिकार गाजवण्यापेक्षा प्रेमाने मन जिंका.
प्रत्येकाला स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे . त्यानुसार त्याला जगू द्या. विनाकारण अपेक्षांचे ओझे नात्यांवर लादू नका.
जास्त गुरफटून न जाता संयम बाळगा म्हणजे कसलीच चूक होण्याची शक्यता नाही. विनाकारण वाहवत जाणे हे
कोणाच्याच हिताचे नसते. ह्याची कायम जाण ठेवावी.
कोणतेही नाते असो ते निर्मळ असावे, निःस्वार्थ असावे. तिथे समर्पण असावे .समजून घेण्याची मानसिकता असावी. वर्चस्व गाजवण्याची वृत्ती नसावी.
जी ती नाती त्या त्या ठिकाणी योग्यच असली पाहिजे. आपण आपली कर्तव्य चोख बजावली पाहिजे.
अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपले कर्म करत राहायचे. स्वतःवर विश्वास ठेऊन नात्यांना जपले पाहिजे. स्वतः आनंदाने जगावे आणि इतरांनाही जगू दिले पाहिजे. नुसतेच गुंतून
राहून का स्वतःला त्रास करून घ्यावा.? त्यापेक्षा आयुष्य
दिलखुलास जगा आणि त्याचा भरभरून उपभोग घ्या.
' गुंतणार नाही आता कशात, जगेल मी माझ्याच भावविश्वात ' ......
सौ. राजश्री सुहास जाधव.
नातेसंबंध.... छान लिखाण👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर लेखन
ReplyDelete🌹🌹खूप खूप मस्त रचना अप्रतिम सुंदर.🌺🌺🌿🌿🌹🌹👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख 👍👍
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteअप्रतिम...!✍️👌👌👌
ReplyDelete