ती वेळ परत यावी
सत्य युगाची ती वेळ परत यावी
मग भीती कशाची न उरावी
भयाने अन् दुःखाने
ग्रासलेले नसावे कोणी
हिंसेचे अन् व्यभिचाराचे
नामोनिशाण जावे मिटूनी
मोकळा श्वास घेण्या नारीस
ना संकोच वाटावा मनी
जगण्याची भ्रांत ना
कोणासही उरावी
अवघी सृष्टी ही
आनंदाने फुलावी
भक्तीचे बीज रुजावे मनी
नेईल तो ईश्वर साऱ्यांना तारूनी
वाट पाहते रे भगवंता
मी या निकोप वेळेची ......
सौ. राजश्री सुहास जाधव.
अतिशय सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर आळवणी केली 👌👌👌
ReplyDeleteयेईल सत्य परतुनी ,विश्वास ठेवा तुम्ही....👌👌
ReplyDeleteखूपच छान...👍👌✍️
ReplyDeleteखुप सुंदर रचना
ReplyDelete