स्वतःचाच टेंभा मिरवून उपयोग काय?
स्वतःचेच म्हणणे खरे करण्यात पराक्रम तो काय !
पोकळ त्या अभिमानास जपायचे ते काय ,
दाखवावा कधी तरी मनाचा मोठेपणा
पत्करून शरणागती, दूर लोटावी अहंभावना
झेंडा तो मानवतेचा रोवूनी,
फडकवावी पताका संवादाची मनामनातूनी ,
शृंखला ही प्रेमळ संवादाची,
राहावी निरंतर भावना आपुलकीची
नसावी जागा तिथे विसंवादाची
संवादातूनी होई आदान- प्रदान विचारांची
आहे ही गुरुकिल्ली यशाची
हीच खरी गरज आहे काळाची.....
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
सौ. राजश्री सुहास जाधव.
खुपच सुंदर रचना 👌👌✍️✍️
ReplyDeleteVva khup khup chan lihilay apratim rachna
ReplyDelete