Tuesday, 28 December 2021

गुरुकिल्ली

स्वतःचाच टेंभा मिरवून उपयोग काय?
स्वतःचेच म्हणणे खरे करण्यात पराक्रम तो काय !

पोकळ त्या अभिमानास जपायचे ते काय ,
दाखवावा कधी तरी मनाचा मोठेपणा

पत्करून शरणागती, दूर लोटावी अहंभावना
झेंडा तो मानवतेचा रोवूनी,

फडकवावी पताका संवादाची मनामनातूनी ,
शृंखला ही प्रेमळ संवादाची,

राहावी निरंतर भावना आपुलकीची
नसावी जागा तिथे विसंवादाची

संवादातूनी होई आदान- प्रदान विचारांची
आहे ही गुरुकिल्ली यशाची
हीच खरी गरज आहे काळाची.....

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सौ. राजश्री सुहास जाधव.


2 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...