खरं सुख हे मानण्यात असतं
बसलो वाट बघत सुखाची जर
सहज ते हुलकावणी देत असतं
दुःखाशिवाय सुख कळत नसतं
सुख अन् दुःख हे येत नि जातं
येणाऱ्या सुखाला अलवार
ओंजळीत घ्यायचं असतं अन्
सुखाच्या क्षणात स्वच्छंद जगायचं असतं
निसटून जाण्याआधी साऱ्यांना
ते वाटायचं असतं कारण,
देण्यात जे सुख असतं
ते कशातच नसतं.....
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर रचना!✍️������
ReplyDeleteवाहह.. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना
ReplyDeleteअगदी बरोबर..खूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDeleteखूप छान लिहिलंय 👌👌👌
ReplyDelete