डोकावलं का कधी हृदयात?
ठेवा वा नका ठेऊ विश्वास,
तो ईश्वरच तर आहे कारण
वाल्याचा वाल्मिकी होण्यास.....
हृदयात प्रत्येकाच्या असे
त्याचाच तर वास,
कधी होतो प्रकट मातेच्या ममतेतून,
कधी प्रकटतो बाल्यावस्थेतून,
कधी पापी, वैरी होऊनी
दावितो त्याचे रूप जगतास....
आहे हे खरे सत्य,
ह्रदयात तो चिन्मय नित्य
परी गवण्यास तो मानवा,
ठेऊनी इंद्रियांवरी ताबा
लागते करावे हृदय ते शुध्द....
सौ. राजश्री सुहास जाधव.
No comments:
Post a Comment