Thursday, 17 February 2022

रेशीमगाठ



जेव्हा दोन जीव,
अडकले जातात विवाह बंधनात,
तेव्हा राहावे लागते त्यांस वचनात
ठेवावा लागतो संयम जीवनात.....

दोन जीवांची ही रेशीमगाठ,
ठेवावी ती अलवार गुंफून
कितीही येऊ दे अडचणींचे डोंगर,
करावे पार दोघांनीही पुढे सरसावून .....

ध्यानी  ठेवावे वचन एकत्र राहण्याचे,
साथीने परस्परांच्या शोधावे मार्ग सुखाचे
न पेरावे बीज मनात शंकाकुशंकांचे
वाताहत होण्यास तेच कारण जीवनाचे .....

दोन जीवांसवे, दोन कुटुंबांचेही ते मनोमिलन,
बांधावी खूणगाठ ही साऱ्यांनी
ठेवावी नाती ती सचेतन,
राखुनी साऱ्यांचा मान परस्परांनी .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


2 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...