परिस्थिती कधीच नसते चुकीची,
मनस्थिती बदला तुमची
परिस्थितीवर मात करून,
धैर्याने वाटचाल करा पुढची ....
परिस्थितीपुढे झुकतोस काय !
हताश होणे हा न उपाय
दाखव हिंमत परिस्थिती बदण्याची,
नको गाळूस कधीच तू हातपाय ....
ठेव भरवसा स्वतःवर
येईल अनुकूल स्थिती,
मेहनत आणि संयमाच्या बळावर
नाही येणार मग वेळ म्हणण्याची,
चुकीची होती परिस्थिती.....
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
सौ. राजश्री सुहास जाधव.
१००% खरी गोष्ट .👌
ReplyDeleteछान 👍👍
ReplyDelete