कातरवेळी, माझ्या अंगणी,
रातराणी ती दरवळली,
देखुनी त्या रातराणीला
मनात प्रीत मोहरली ....
सांजवेळी नभांगणी,
दशदिशांना पसरली सूर्यास्ताची लाली,
भुरळ घाली ती माझ्या मनाला,
अलवार भावना मनी जागली ....
करुनी तेजोमय साऱ्या विश्वाला,
रोज जाई तो भास्कर अस्ताला
घेऊनी नवचैतन्याची पहाट,
तो सूर्य पाहा कुशीत निशेच्या विसावला....
पाहुनी त्या अनुपम दृष्याला,
पडे भुरळ माझ्या मनाला
जागे आस ती नव्याने,
चैन पडेना या जीवाला .....
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
सौ. राजश्री सुहास जाधव.
व्वा मस्तच
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌👌
ReplyDelete